
अनंत विचार न्यूज दिनांक 4/7/2025
पंढरपूर ( प्रतिनिधी )
राज्यातील शेतक-यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधीमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील , खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत पांडूरंगास साकडे घातले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतक-यांचा सात बारा कोरा करून संपुर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतक-यावर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी सुचावी या मागणीसाठी पंढरपूरात आज शेतक-यांना मोठी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकड घालण्यात आले. राज्य सरकारला जर शेतक-यांची कर्जमाफी करण्यास व शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्दी सुचली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचे साकड घालण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे सचिन दादा पाटील, रवी मोरे तानाजी बागल, दामू इंगोले विजय रणदिवे, किशोर ढगे शिवाजी भाऊ पाटील, अजित बोरकर, किरणराज घाडगे, प्रताप गायकवाड संदीप पाटील राहुल पाटील महादेव शिंदे अजिनाथ परबत सचिन ताटे नितीन शिंदे शहाजहान शेख बंडू सावळे नामदेव पवार इ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते