
अनंत विचार न्यूज दिनांक 21/9//2024
पंढरपुरातील काशीकापडी समाज तुळशीची माळ बनवणारे कारागीर म्हणून शासन दरबारी प्रथमच नोंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तुळशीची माळ बनवणारे कारागिरांबरोबर केली चर्चा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्रातील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी वर्धा/
वर्धा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पी एम विश्वकर्मा 2024 या कार्यक्रमांमध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठलास प्रिय असलेली तुळशीच्या लाकडापासून तुळशीची माळ बनवणारे कारागीर हे काशीकपडे समाजाचे आहेत. काशीकापडी समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच आहे.वारकरी सांप्रदायामध्ये तुळशीच्या माळेस अनन्यसाधारण महत्व असणार्या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात काशीकापडी समाज ओळखला जातो.
राज्यातील विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे. पिढ्यानपिढ्या वारकर्यांची सेवाभावी निस्सिम भावनेने करणारा हा समाज शासनाच्या विविध योजना पासून वंचित होता.परंतू विश्व कर्मा योजने मध्ये तुळशीच्या लाकडापासून तूळाशी माळा बनवनारा कारागिर म्हणून यांची शासन दरबारी प्रथम नोंद झाली यासाठी समाजातील सदस्य स्वप्निल टमटम, अनिल इंदापूरक,निरंजन पानकर,नितीन पानकर ,विशाल वाडेकर व समाजातील पदाधिकारी या सर्वांनि सहकार्य केले.या योजनेचा लाभ सर्व काशिकापडे समाजातील सर्व समाज बांधवांनी कारागिरांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुनील वाळूजकर व योगेश काळे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.